विमुक्त मी पण मुक्त ?
विमुक्त मी पण मुक्त ? आज ३१ ऑगस्ट "भटक्या विमुक्त समाजाचा स्वातंत्र दिन" तसा हा भटका समाज मुळ उत्तर भारतातला. मिठाचा व्यापार करणारी आणि राजा-महाराजांना रसद पुरवणारी जमात म्हणुन ओळखली जाते... आज भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. पण या काळात माझा भटका विमुक्त समाज हा खरचं स्वातंत्र्य झाला का? हा एक प्रश्नच आहे. याचं उत्तर तुम्हा आम्हाला ठाऊकच आहे. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी हा भटका समाज आत्यंत सुखी समाधानी होता. त्यांचा व्यापार आणि रसद पुरवण्याचा काम ए्ढ्या पुरती मर्यदीत होता. पण मोघल असो की निजाम की छञपती शिवाजी महाराज यांच्याशी प्रमाणीक काम करणारा हा भटका समाज होय. निजाम आणि मोघल शाही संपती न संपतीच ब्रिटिश भारतामध्ये आले आणि इथेच राज्य करु लागले. आणि त्यांनी भारतात रेल्वे,तार, दळणवळण इ. ची निर्मिती करुन लागले आणि या आमच्या भटक्या समाजाचा पारंपरिक व्यवसाय अनेक कायदे करून बंद पाडला गेला. यामध्येच एक कायदा होता #Criminal_Act 1871 मग यातुन प्रश्न तयार झाला तो रोजी रोटीचा. इंग्रज आमच्या वर आन्याय अत्याचार करु लागले, य...