पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
 शिक्षणाचा महामेरू: महात्मा फुले     भारतीय समाजाच्या पाया हा चार वर्णावर आधारित आहे. अर्थातच वर्णव्यवस्थेचा पुरस्कारर्ता म्हणून भारत देशाला ओळखले जाते. या वर्णव्यवस्थेतून जातीय उतरंड निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळते. या जातीय उतरंडीमुळे वरतून खाली तिरस्कार व खालून वर द्वेष (ब्राह्मण ते अतिशूद्र व अतिशूद्र ते ब्राह्मण)  एकमेकांबद्दल टोकाचा होता. यामुळे भारतीय समाज हा पूर्णपणे विषमतामुलक बनलेला होता. या विषमतामुलक स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी व समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी, आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा स्वीकार भारतीयांनी करावा, अंधश्रद्धेपासून भारतीयांची मुक्तता व्हावी, भटांच्या कटातून, अंधश्रद्धेतुन  भारतीयांना मुक्तता मिळावी, एक नवी दृष्टी मिळावी. या अस्थिर समाज व्यवस्थेला छेद देऊन या समाजात नव चैतन्य घडवून आणणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज 133 वा स्मृतिदिन जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा त्यांचे आठवण म्हणून त्यांच्या विचाराची जागरण करत असतो. की ज्या विचारामुळे समाज जागृत होत आहे.      आधुनिक काळात ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते शिक्षण मह...

अस्थिर महाराष्ट्र...!

इमेज
 अस्थिर महाराष्ट्र...!        महाराष्ट्र राज्य हा संत परंपरेचा वारसा सांगणारा राज्य आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा व संत सेवालाल महाराज इ. विविध जाती-धर्मातील, पंथातील संतांनी या विषमतामुलक समाज रचनेवर वेळोवेळी आपल्या अभंगातून प्रहार केला. शिवाय महाराष्ट्र हा एक पुरोगामी विचारांचा देखील मानला जातो. या पुरोगामी विचार प्रवाहामध्ये आपण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. अनेक सुधारकांचा समावेश करतो. त्यांनी भारतीय समाजरचनेतील या रुढीवादी, अंधश्रद्धाळू, सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजात आपल्या विचारांच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण केले. त्यामुळे आपण पुरोगामी या शब्दाचा विचार केल्यास असे दिसते की, 'पुर:' म्हणजे 'पुढे' आणि 'गामि' म्हणजे 'जाणारा' याचाच अर्थ असा की पुढे जाणारा. (महाराष्ट्र)       महाराष्ट्र हा भारत देशामध्ये सुधारणेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. जिथे लोकांमध्ये श...