पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बंजारा समाजाचे जगद्गुरू संत डॉ. रामरावजी महाराजांच्या निर्वाणाची पोकळी भरून निघेल का?

इमेज
  बंजारा समाजाचे जगद्गुरू संत डॉ. रामरावजी महाराजांच्या निर्वाणाची पोकळी भरून निघेल का?  बंजारा समाजाचे आद्य गुरु डॉ. संत रामरावजी बापू यांच्या निधनाची बातमी कळताच समस्त बंजारा समाज व समाजेत्तर  भक्तजगणात शोककळा पसरली. संत रामराव महाराजांच्या जाण्याने बंजारा समाज आज पोरका झाला. संत रामराव महाराज हे जगद्गुरु संत श्री. सेवालाल महाराजांचे वंशज आहेत .त्यांचे आयुष्य हे ब्रम्हचर्य जिवन जंगले. ते जन्मभर अन्नग्रहण केले नाही. केवळ दुधावर आपले जीवन व्यतीत करणारा आचार विचार आणि सदाचार यामध्ये कधीही फारकत न करणारा संत हा निराळाच आहे ‌‌.  रामराव महाराज यांचा जन्म ७ जुलै १९३५ रोजी झाला व मुत्यु ३० आॅक्टोबर २०२० रोजी मुंबई स्थित झाला.  माता पुतळाबाई व पिता परशुराम यांच्या पोटी जन्मलेले रत्न  यांचा जन्म गुरु पौर्णिमेला झाला व निर्वाण कोजागिरी पौर्णिमेला झाला. हा एक निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. संत सेवालाल महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार त्यानी वाडी, वस्ती व तांड्यावर केला. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या वाळवंटात त्यांनी अध्यात्माची हिरवळ फुलवली.      ...

बळीराजाची कुचेष्टा.

इमेज
बळीराजाची कुचेष्टा.. भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात हरितक्रांती १९६५ घडवून आणली एम.एस. स्वामीनाथन व महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांनी. या  हरीत क्रांती मुळे काय घडले? तर हा संपूर्ण भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. तो स्वंयपूर्ण झाला शेतकऱ्यांमुळे. कारण शेतकरी वर्ग हा नोकरदार वर्गासारखा ८ तास काम करीत नाही तर तो दिवस रात्र शेतात राबतो म्हणुन माझा देश आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.         महाराष्ट्रामध्ये यंदा खरीप हंगामाची सुरुवात ही अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली होती. या वर्षी जुन महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस पडला. त्यांचा परीणाम असा झाला की, शेतक-यांची  पेरणी वेळेवर झाली. त्यामुळे सगळीकडेच पीक पाणीही जोमात होते. आणि ऐन काढणीच्या वेळी महाराष्ट्रातील सर्वच भागात परतीच्या पावसाणे धुमाकूळ घातली. यामुळे शेतात अत्यंत डैलाने उभा असणारा पीक कधी होत्याचा नव्हता झाला हे कळालेच नाही. अक्षरशः शेतक-यांच्या शेतातील माती वाहून गेली, शेतात सोयाबीन काढणी करुन ठेवलेल्या गंजच्या गंज वाहत्या पाण्यात वाहुन गेलेल्या, कोणाचे बैल...

नवरात्रीतील अंधश्रद्धा..

इमेज
  नवरात्रीतील अंधश्रद्धा....       आज आपण २१ व्या शतकामध्ये जगत आहोत, संपूर्ण जग हा चंद्रावर जाण्याच्या तयारीत आहे आणि आमचा भारत देश अंधश्रद्धेचा कळस पार करत आहे.  कारण भारतीय समाज व्यवस्था ही मुळातच मनुवादी विचारसरणीवर आधारीत आहे. याचे कारणही तसेच आहे. या भारत देशात वर्णव्यवस्था होती आणि या वर्णव्यवस्थेनुसार फक्त ब्राम्हणांना शिक्षणाचा अधिकार होता त्याचा परिणाम असा झाला की समस्त बहुजन समाज हा अशिक्षीत राहिला. आणि समाज अशिक्षित राहिलेल्या कारणांमुळे भटांनी या समाजावर जे काही विचार लादले गेले ते विचार आजही समस्त बहुजन समाज सोडायला तयार नाही. यांच्या मनामध्ये जात-पात, देव - धर्माचा व अंधश्रद्धेचा भुत डोक्यात फिट्ट करुन ठेवलेला आहे आणि हे लोकही त्याला uninstall करायला तयार नाही.         प्रत्येकाने देवावर श्रद्धा ठेवावी किंवा न ठेवावी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. सद्या देशभरात नवरात्र महोत्सव हा आनंदाने  साजरा केला जातोय, तरी या वर्षी कोरोना महामारीच्या कारणांमुळे 'दांडीया' ला कुठेतरी ब्रेक लागलेला दिसुन येतो. (त्यामुळे अनेक व्य...

महाज्योतीच्या प्रतीक्षेत संशोधक विद्यार्थी.

इमेज
बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर आधारित भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या शिक्षणासाठी जाहीर झालेली महाज्योती माय बाप सरकार कधी लागु करणार? महाज्योती ही योजना महाराष्ट्र शासनाने भटके-विमुक्त, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थी हित समोर ठेवून आपण १) समाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. आस्थाप्र-२०१७/२६४/आस्था-१,दि.२५/०६/२०१९. २) विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण - २०१९/प्र.क्र. १११/ मावक. दि. ०६/०७/२०१९ वरील शासन निर्णयानुसार दिनांक ८ आॅगस्ट २०१९ रोजी महाज्योती या संस्थेची स्थापना केली. भटका-विमुक्त समाज हा वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. त्याचबरोबर इतर मागासवर्गीयांचे हीच स्थिती आहे. वरील समूह पैकी अनेक वर्ष जंगलामध्ये भटकत राहणारा समूह हा मागील काही वर्षांमध्ये हळूहळू स्थिर होत आहे. मात्र या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि त्याचा परिणाम म्हणून हा समाज आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. याचे कारण , समुदायातील लोकांची ...

विरोधी पक्षनेत्यांची दुटप्पी भूमिका?

इमेज
  विरोधी पक्षनेत्यांची दुटप्पी भूमिका?  मागील काही दिवसांपासून संपूर्ण भारत देश हा नैसर्गिक आपत्तीत छायेत अडकलेला आहे मग गेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी झालेली ढगफुटी व त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रात देखील Covid 19 सारखा महामारीचा आजार ( चिनच्या वुहान शहरातुन पसरलेला ) पसरला आणि संपूर्ण देश कुलूप बंद म्हणजेच लाॅकडाऊन करावे लागले. त्याच वेळी केंद्रीय सत्तेत असणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM Care Found  नावाचे एक आपत्ती काळात मदत निधी गोळा करण्यासाठी एक वेगळे अकाउंट काढले गेले त्याच वेळी महाराष्ट्र राज्याने देखील महाराष्ट्रातील लोकांना मदत मिळाली या उद्देशाने CM Care Found नावाने अकाउंट तयार केले गेले.  पण या पुरोगामी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी या नावाने ओळखला जाणारा  भारतीय जनता पार्टी ह्या पक्षातील अनेक नेते, त्यामध्ये महाराष्ट्राचे सद्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन इ. व यांसारखे या पक्षाचे अनेक नेत्यांनी असे आव्हान केले होते की, महाराष्ट्रातील ...

भारताचा खरा चौकीदार

इमेज
  #चौकीदार_चोर_का_आहे_??    भारताला स्वातंत्र्य मिळुन ७० वर्ष उलटून गेले. या ७० वर्षाच्या काळात अनेक पक्षांची सत्ता आली आणि गेली देखील... पण या व काळामध्ये सर्वाधिक काॅग्रेस हा पक्ष सत्तेवर राहिलेला दिसुन येतो. आणि त्यानंतर जनता पक्ष व भाजपा असे काही पक्ष आहेत की ते केंद्रीय सत्ता उपभोगलेली दिसुन येते..      पण आपण २०१४ पासुन ते सद्याच्या भाजप सरकारकडे पाहिले तर अशी वेगळीच भूमिका तयार होवू लागते. जे की २०१४ ला भाजप विषयी जो आपलेपणा ,जिव्हाळा किंवा त्याला आपण Attractions होतं ते आता तरी दिसुन येत नाही.. #याचे_कारण_अनेक_आहेत-- १) #शेतकऱ्यांचा_नेहमीच_केला_जाणारा_अपमान-- जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आला आहे तेव्हापासून या शासनातील अनेक विद्वान नेते रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग असो की उत्तर प्रदेश मधील अनेक बाहुबली नेते या नेत्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाबतीत अक्राळ विकाळ बोलेलं आपल्याला दिसुन येते.... २) #बेरोजगारांची_संख्या_वाढवली--- हा भाजप सरकार सत्तेवर आला तो भारतीय युवांच्या जोरावर यांचे कारण असं होतं की, याने आश्र्वासन...
इमेज
  #तांड्याचा_नायक_ते_महाराष्ट्राचा_नायक वसंतराव नाईक-----  #जिवन_परिचय:--     महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील #गहुली या गावातील बंजारा समाजातील एका  शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. आईचे नाव #होनुबाई व वडिल #फुलसिंग नाईक. आणि याच महामानवाचा जन्म दिवस कृषी दिन म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात एव्हाना भारतभर साजरा केला जातो..त्यांनी ६ जुलै १९४१ रोजी वत्सला घाटे (ब्राम्हण), नागपूर यांच्यांशी #आंतरजातीय विवाह केला. ते नेहमी बंद गळ्याचा कोट, तोंडात चिरुट, चमकदार सोनेरी चष्मा असा त्यांचा आधुनिक पध्दतीचा राहणीमान कारण वसंतराव नाईक यांच्यावर #महात्मा_फुले, डेल कार्नेन तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांचा प्रभाव होता.    बंजारा समाजातील पहिले वकिल तसेच पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष, मध्यप्रदेशाचे महसूल खात्याचे उपमंत्री, महाराष्ट्राचे सहकार मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री याशिवाय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. विरोधी पक्षांचा आदर करणारा माणूस असा हा त्यांचा जिवन प्रवास.. #मला_घडविण्या...