राजकारण्यांचा ढोंग आणि भोंग्यांचा सोंग...
राजकारण्यांचा ढोंग आणि भोंग्यांचा सोंग... छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदताना आपल्याला दिसते. मात्र या सुखी संसारामध्ये आग लावण्याचे काम मात्र राजकारणी मंडळी सातत्याने करताना दिसून येते. या आगीतुन आपली राजकीय पोळी भाजून घेतात हे काही आपल्यासाठी नवीन नाही. विशेषतः आग निवडणूक जवळ आल्यास किंवा निवडणुकीचा काळ चालू असताना अधिक धगधगते, या धगधगत्या आगीत राजकारणी मंडळी व त्यांचे पुत्र/चिरंजीव, कन्या आप्त-स्वकीय हे कधीच या आगीच्या रणांगणात उतरत नाही. उतरतात ते आमचे हिंदू बहुजन पोरं. यातून फायदा तर या बहुजन पोरांचा काही होत नाही; मात्र नुकसान ही अटळ असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्ते-धर्ते व राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी सभा घेतली. त्या सभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले क...