शेतकरी पुत्राची बाजार समितीत भरारी.
शेतकरी पुत्र शेषेराव हिरामण चव्हाण यांनी मागील दोन दशकांमध्ये स्थानिक राजकारणापासून स्वतःच्या राजकीय जीवनाची मूर्तमेढ रोवली. सोबतच शेती हा व्यवसाय देखील सुरू होता. शेती आणि राजकारणाशी आसलेली नाळ अशा दोन्ही कलांच्या संगमातून स्वतःला सातत्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आसे. आपल्या वाणीतून, राहणीमानातून व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांवर मात देत स्वतःला सावरत, सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असणारे. स्थानिक प्रश्नाबाबत जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून देखील ओळख निर्माण करणारे; सन्माननीय म्हणून आणि खेडो-पाड्यांमध्ये ओळख असणारे नेते. अनेक वेळा स्थानिक राजकारण अर्थात ग्रामपंचायत निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळी थोड्या मताने पराभूत झाले. मात्र गावाचा विकास आणि आपल्या शेतकरी मित्राचा विकास हाच संकल्प जणू उराशी बाळगून सातत्याने आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले. कधीही पराजयाचा खापर कोणावरही न फोडता स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा-पुन्हा अग्नी परीक्षा देत राहायचे. ग्रामपंचायत निवडणूक मध्ये पराभूत झाले असले तरी; विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये मतदार राजांनी विश्वास दाखवून ब...