महाज्योतीत संशोधनाला किंमत शुन्य!!!

 महाज्योतीत संशोधनाला किंमत शुन्य!!!


       महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या मिटिंग नुसार अर्थात बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्या दिनांक 22/04/2022 रोजीच्या निर्णयानुसार महाज्योती या संस्थेमार्फत पीएच.डी करणाऱ्या म्हणजेच संशोधक विद्यार्थ्यांसाठी जी फेलोशिप योजना आहे, त्या योजनेची नवीन जाहिरात काल दिनांक 1 मे 2022 रोजी जाहीर झाली. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था  अर्थात महाज्योती असे या संस्थेचा  नाव आहे. या संस्थेच्या नावांमध्ये "संशोधन आणि प्रशिक्षण" या दोन शब्दाचा प्रामुख्याने उल्लेख आहे.  मात्र महाज्योतीचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना कदाचित संशोधन आणि प्रशिक्षण या दोन शब्दातला अर्थ कळाला की नाही? असा प्रश्न आम्हा संशोधक विद्यार्थ्यांना पडतो.  खऱ्या अर्थाने  या संस्थेने संशोधनावरती खर्च करायला हवे; परंतु  ही संस्था संशोधन आणि प्रशिक्षण सोडून, शेतकऱ्यांना अनुदान वाटप योजना राबवते. (महाराष्ट्रात कदाचीत कृषी खाते अस्तित्वात नसल्यामुळे) या अनुदानास पात्र शेतकरी कोणते? तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील शेतकरी जे महाज्योतीचे अध्यक्ष मा. विजय वडेट्टीवार यांच्या मतदार संघाचा सहित पूर्व विदर्भाचा भाग येतो. जर यांना शेतकऱ्यांना अनुदान वाटप करायचाच असेल या संस्थेमार्फत तर आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील त्यांनी अनुदान दिले पाहिजे. मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यांनी बिंदास्त अनुदान वाटप करावे. आणि संशोधन मागे ठेवावे. 
       काल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन जाहिरात आली. ती जाहिरात वाचल्यानंतर असे लक्षात येते की,  52 ते 56 % लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी, भटक्या-विमुक्त जाती जमाती व इतर विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फक्त 200 जागेची जाहिरात काढली. आम्हा संशोधक विद्यार्थ्यांची तर अशी मागणी आहे की आपण या 200 जागा देखील काढू नका. तुम्ही पोलीस भरती, एमपीएससी व यूपीएससी क्लासेस घ्या आणि यांच्यामार्फत दलाली मिळते. इकडे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यातून या संस्थेच्या लोकांना दलाली मिळत नाही. त्यामुळे सातत्याने आणि वारंवार महाज्योती अंतर्गत येणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यावर अन्याय अत्याचार करण्याचे काम महाज्योतीचे अध्यक्ष व संचालक मंडळ हे सातत्याने करत आहे. 

      एकीकडे सारथी व बार्टी सारखी संस्था संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बिंदास्त खर्च करतात. या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवढे येथील तेवढे सर्व फॉर्म घेतले जातात व सर्व विद्यार्थ्यांना सारथी व बार्टी सारखी संस्था सरसकट फेलोशिप देते. मात्र आमचे ओबीसी या महाराष्ट्रात खुप श्रीमंत आहेत? गडगंज संपत्ती यांच्याकडे आहे? या भटक्या-विमुक्तांना कडे ऑडी, फॉर्च्यूनर, इनोवा आहेत? मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी त्यींच्याकडे भले-भले बंगले आहेत? त्याचबरोबर यांच्याकडे करोडोंच्या संपत्ती?  असल्यासारखे ही संस्था कधी 150 ची तर कधी 200 अशा जाहिराती काढतात. त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडतो की आम्ही संशोधन करावी की नाही. कारण ओबीसी ची लोकसंख्या पाहता 200 जागा ह्या पुरेशा नाहीत. त्यामुळे महा ज्योतीच्या अध्यक्षांनी व संचालक मंडळाने तात्काळ यामध्ये दुरुस्ती करावी आणि किमान लोकसंख्येच्या प्रमाणात 2000 विद्यार्थ्यांची नवीन जाहिरात काढावी, अन्यथा ओबीसी, भटक्या- विमुक्त समाजातील व इतर विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरून महाज्योतीच्या अध्यक्षा सहित संचालक मंडळाचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. याचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास तयार राहावे...

बळीराम शेषेराव चव्‍हाण, संशोधक विद्यार्थी, उस्मानाबाद. 9028446942

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक